मीर उस्मान अली खान
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
मीर उस्मान अली खान सिद्दिकी, असफ जाह सातवा '(६ एप्रिल १८८६ - २४ फेब्रुवारी १९६७) हा हैदराबाद आणि बरारचा शेवटचा निजाम होता. सन १९११ आणि १९४८ च्या दरम्यान त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले.[1] २६ जानेवारी १९५०रोजी हैदराबाद हे भारतातील नवे राज्य बनले. स्वातंत्र्या नंतरही १९४७ नंतर निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा छळ झाला. यामध्ये धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश हे प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. निजामाच्या काळात हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. निझामाने प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. मुस्लिम काळात भारतात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या निझामाच्या राज्यात वाढवली गेली. निझामाने नोकरी देण्याच्या नावाखाली हिंदू ज्ञानाची लुट केली गेली. हिंदू राज्यांवर हल्ले केले गेले, हिंदू संपत्तीची लुट केली गेली. हिंदू वर गैर-मुस्लिम म्हणून निर्बंध आणि भेदभाव सहन करावा लागला होता. निजामाच्या काळात मंदिरे आणि हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश, विद्वान हिंदू भिक्षूंच्या हत्या आणि हिंदू विद्यार्थ्यांचे विखुरणे, यामुळे हिंदू शिक्षणात मोठ्या प्रमाणात घट झाली.
निजामाला "निझाम सरकार" किंवा "हजूर-ए-निजाम" म्हणत.[2] त्यानंतर भाषेच्या आधारावर हैदराबाद राज्याचे विभाजन होऊन त्याचे तुकडे आंध्र प्रदेशाचे, कर्नाटकाचे आणि महाराष्ट्राचे भाग बनले.चा भाग बनला. त्यावेळवा निजाम हा सहावा निज़ाम -महबूब अली खानचा मुलगा होत. सतत पराभवातून स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्याचे तुरळक उदाहरण निजामचे संस्थान हे एक आहे. कधीही विजय झाला नाही हे याचे वैशिष्ट्ये. मराठ्यांबरोबरची पहिली लढाई : हार. दुसरी : हार. तिसरी : हार. असे जे सतराशे तेवीस-चौवीसपासून चालले ते सतराशे ब्याण्णवपर्यंत. सर्व मोठ्या लढ्यांत निजामाची हार झालेली दिसून येते.